विशेष पोस्ट

शिवसेनेतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

संवाददाता, जनार्दन कदम महाराष्ट्र राज्य उपप्रमुख
दिनांक :१३/०६/२०२१

ठळक मुद्दे

शिवसेनेतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट

वाटप

पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे साधले औचित्य
कोल्हापूर : शिवसेना शहर कार्यालय येथे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी शिवसेना आणि मेनन इंडस्ट्रीज यांच्यावतीने पाच लाखांचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि एक हजार गरजू नागरिकांना दहा लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मोफत ऑक्सिजन सेवा राबविणाऱ्या मणेर मस्जिद ट्रस्टला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले. कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला आर्थिक स्वरूपात मदतजाहीर करण्यात आली. त्याचबरोबर गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

यानंतर सेवाभावी संस्थांच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान केले. गांधी मैदान येथील कै. विष्णुपंत इंगवले कोविड सेंटरला एक लाख,दिगंबर जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरला पन्नास हजार आणि व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या संताजी घोरपडे मोफत कोविड सेंटरला पन्नास हजार अशी मदत करण्यात आली.

कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत असून, राज्य शासनासह कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात असल्याचे राजेश क्षीरसागर म्हणाले.
यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, राहुल चव्हाण, राजू हुंबे, मेनन कंपनीचे विकास पाटील, अरुण सावंत, सुनील जाधव, रमेश खाडे, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, निलेश हंकारे, अभिषेक देवणे, रियाज बागवान, अंकुश निपाणीकर, साहिल बागवान, रणजीत मिणचेकर, मणेर मस्जिदट्रस्टचे हिदायत मणेर, शफिक मणेर, इम्रान मणेर, मेहबूब नदाफ, शकील पटवेगार, हमीद मणेर उपस्थित होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button