विशेष पोस्ट

पिंपरी-चिंचवड करांच्या कोट्यवधी रुपयांवर संघटितपणे टाकलेल्या दरोडा प्रकरणात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,यांनी थेट अजितदादांनाच केले

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, ११-२-२९२१.
पिंपरी, दिनांक, १०.(पिंपरी चिंचवड – कोरोना केअर सेंटरच्या नावाखाली महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, त्यांच्या खालचे अधिकारी, ठेकेदार आणि काही नगरसेवकांनी मिळून पिंपरी-चिंचवड करांनी घाम गाळून जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांवर संघटितपणे अक्षरशः दरोडा टाकला आहे. त्यासाठी दरोड्याच्या टोळीचे प्रमुख सूत्रधार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच “मॅनेज” केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. पिंपरी-चिंचवड करांच्या कोट्यवधी रुपयांवर टाकलेल्या दरोड्यामध्ये सामील नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच राष्ट्रवादीच्या बाजूने झुकणारे असल्याचे उघड गुपित आहे. अजितदादा आणि राष्ट्रवादीवर या दरोड्याचे बिल फाटू नये म्हणून आम्ही आंदोलन करू, न्यायालयात जाऊ असा राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून नुसताच इशारा दिला जात आहे. त्यामुळे लुटले गेलेले कोट्यवधी रुपये परत येणार नाहीत, हे वास्तव पिंपरी-चिंचवड करांना मान्य करावे लागणार आहे.
तरीही या कंपनीने महापालिकेला सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे बिल पाठविले. बिलांची जबाबदारी पाहणाऱ्या महापालिकेच्या मुख्य लिपिकाने बिलावर आक्षेप घेत सेंटरमध्ये सुविधा आणि एकाही रुग्णावर उपचार केले, नसताना हे बिल अदा करण्यास हरकत घेणारी टिप्पणी नोंदविली आहे. हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी बाहेर आणल्यानंतर शहरात खळबळ उडाली. अनेकांनी हे बिल देण्याविरोधात महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. स्थायी समितीने सुद्धा बिल देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली गेली. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, आणि अतिरिक्त आयुक्त अजित पवार,यांनी प्रशासकीय शाळा करून स्थायी समितीच्या मंजुरी आधीच स्पर्श हॉस्पिटल कंपनीच्या बँक खात्यावर तब्बल ३ कोटी १४ लाख ९०० रुपये जमा करण्यास मूक संमती दिली. त्यानुसार त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम दिनांक, २५.जानेवारी २०२१.रोजी अशोक नागरी सहकारी बँकेत असलेल्या स्पर्श हॉस्पिटल कंपनीच्या खात्यात तत्परतेने जमा केले आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button