लाईटबिल वाढीव येत आहे, या गोष्टी कराल तर वाढीव लाईटबिल येणार नाही

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, १-२-२०२१.
मुंबई : सध्याच्या काळात बघायचे झाले तर श्रीमंत लोकांपासून गरीब लोकांपर्यंत सर्वजण वाढीव विजबिलावरून त्रासले आहेत. पण वाढीव वीजबिल का येते? याच्यामागे कोणती कारणे आहेत? हे जवळजवळ ७० ते ८० टक्के लोकांना माहीतच नाहीये.
वाढती वीज बिलांसाठी ग्राहकांनी घ्यावयास हवी खालीप्रमाणे काळजी.
१) मीटर चे रिडींग घेण्यास येणाऱ्या व्यक्तीचे नाव, ID प्रूफ, आणि रिडींग घेतल्या तारखेला त्याची सही घेणे
२) पुढल्या वेळेस हे रिडींग ३० दिवसांनी घेतले जाते का नाही ह्याची खात्री करणे.
३) पुढल्या वेळेचे रिडींग ३० दिवसा नंतर घेण्यास आल्यास त्याला रिडींग घेण्यास मनाई करून त्वरित त्याची तक्रार विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यानं कडे लेखी करणे.
४) बिल्डिंग सोसायटी असल्यास सेक्रेटरींनी आपल्या बिल्डिंगच्या वॉचमन कडून ह्या गोष्टी करावयास लावाव्यात.
१०० रिडींग पर्यंत ३.७६ रुपये प्रति युनिट आहे.
परंतु रिडींग ३० दिवसा नंतर घेतल्या मुळे रिडींग
१०० च्या वर रिडींग गेल्यास हेच दर दुप्पट म्हणजेच ७.२१ रुपये प्रति युनिट आहे.
३०० च्या वर रिडींग गेल्यास दर तिप्पट ९.९५ रुपये प्रति युनिट आहे.
५०० च्या वर रिडींग गेल्यास चौपट ११.३१ रुपये प्रति युनिट आहे.
आपल्याला येणारे वाढीव बिल हे वरील एकमेव कारणाने येत आहेत
कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे सामान्य जनतेला भुर्दंड पडतो. तरी आपण सर्वांनी वरील गोष्टी पाळून आमच्या कर्मचाऱ्यांना वठणीस आणावे ही विनंती स्वतः महाराष्ट्र वीज वितरण यांनी केली आहे.