मराठी

दापोडी रेल्वे अपघात थांबवण्यासाठी जनजागृती सामाजिक अभियान..

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,८-९-२०२१.
रेल्वे लाइन क्रॉस करतेवेळी रेल्वेची धडक बसून मरण पावलेल्या व्यक्तींची संख्याही सर्वाधिक दापोडी विभागात आहे….
रेल्वे लाईन वर अनेक युवक ,नागरिक मुले बसलेले असतात , गुलाब नगर, जय भीमनगर, सिद्धार्थ नगर येथील नागरिक रेल्वे क्रॉसिंग करण्याचा उपयोग करतात तसेच अनेक वेळा काही मुले पतंग किंवा इतर खेळ खेळताना दिसतात तर काही युवक नागरिक मद्यपान करतानाही बसलेले असतात यामुळेच…
रेल्वे मंत्रालयाच्या सूचनांनुसार दखल घेत पुणे आरपीएफ च्या वतीने
विभागीय सुरक्षा आयुक्त पुणे श्री. उदयसिंग पवारसाहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडी, मध्ये रेल्वे लाईन वरील नागरिक व वस्तीमध्ये जाऊन रेल्वे अपघात थांबवण्यासाठी जनजागृती सामाजिक अभियान राबवण्यात आला.
आरपीएफ च्या वतीने उपनिरीक्षक श्री. डी. एन. लाड, यांनी रेल्वे लाइन क्रॉस करतेवेळी होणारे अपघात व यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी रेल्वे लाइन क्रॉस न करता पर्याय ब्रिज, रुब तसेच अन्य सुरक्षित मार्गाचा वापर करावा तसेच रेल्वे गाडी वरती दगड व अन्य कोणत्याही वस्तू फेकून मारू नये जेणेकरून जीवितास धोका उत्पन्न होणार नाही, असे कृत्य होणार नाही व रेल्वे लाईन मध्ये बसणारे ,थांबणारे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असे नागरिकांनी पुढे मत व्यक्त केले.
…..यावेळी पुणे विभागीय रेल्वे बोर्ड समिति सदस्य विशाल वाळुंजकर, यांनी रेल्वे प्रशासन व आरपीएफ यांच्या आव्हानाला सहकार्य करावे व आपण आपला जीव इतरांचा जीवाचे काळजी घेऊन रेल्वे लाईन लगतच्या सर्व नागरिक मध्ये जनजागृती लोकसहभागाने करावे असे आवाहन नागरिकांमध्ये केले.
पुणे आरपीएफच्या वतीने अपघात रोखण्यासाठी केलेल्या अभियानामध्ये विभागीय सुरक्षा आयुक्त पुणे, श्री. उदयसिंह पवार साहेब, पोलीस निरीक्षक शिवाजीनगर श्री. एन. डी. खिरटकर, साहेब, उपनिरीक्षक खडकी डी. एन. लाड साहेब , पुणे विभागीय रेल्वे कमिटी सदस्य विशाल वाळुंजकर, हेडकॉन्स्टेबल जितेंद्र महाजन, कॉन्स्टेबल साईनाथ झंपले
आरपीआय उपाध्यक्ष सिकंदर सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, रवी शिरसागर, बाबा शेख संदीप तोरणे, यांच्या प्रमुख उपस्थित अभियानात संपन्न झाला.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button